Search AbideInSelf

Total Pageviews

Thursday, July 26, 2012

काहे को रोए... काहे को रोए!


Picture courtesy: Latika Teotia

काहे को रोए... काहे को रोए!
बनेगी आशा... इक दिन...
तेरी ये निराशा!
काहे को रोए... चाहे जो होए... !
काहे को रोए... चाहे जो होए...!

सफल होगी तेरी आराधना...!
काहे को रोए... काहे को रोए...!

कही पे है दुखःकी छाया...
कही पे है खुशियोंकी धूप!
बुरा-भला जैसा भी है...
यही तो है बगिया का रूप,
फूलोंसे, काटोंसे.... माली ने हार पिरोये!

काहे को रोए... चाहे जो होए...
सफल होगी तेरी... आराधना...!

क्या है ये सुख... क्या है ये दुखः? धूप-छांव का खेल... या भले-बुरे का मेल? ये बगिया रूपी जीवन... अस्तित्व... आखिर है क्या? क्यूं है कही पर सुख की छाया और क्यूं है कही पर दुखःकी धूप???

जीवन एक समग्रता का नाम है... संपूर्णता का नाम है....जिसमे फूलोंके साथ कांटे भी समाये है! फिर क्यूं है हमे फूलोंसे लगाव और कांटोसे अलगाव??? आखीर... चाहते क्या है हम जीवन से??? क्या है हमारी, सच मे 'आराधना'... 'प्रार्थना' ?? क्यूं है ये 'आराधना'... ये 'प्रार्थना'??? क्यूं नही पूरी हो पाती ये 'आराधना'??? क्या हम सिर्फ सुखही सुख चाहते है... शाश्वत सुख? सही मायने मे यहा हर कोई 'शाश्वत-सुख' ही चाहता है...हर कोई शाश्वतता ही ढूंड रहा है...! और वोह मिल नही पाती है इसिलिये दुखः लगता है! क्यूं नही मिल पाता ये... शाश्वत-सुख???

क्या है असल मे 'आराधना'??? कहा थी ये आराधना... जन्म से पहेले... जीवनकी शुरुवात से पहेले? क्या ये 'आराधना' ये 'प्रार्थना' मौजूद थी तब???? क्यूं नही थी मौजूद ये... जन्मसे पहेले??? क्या है असल मे 'आराधना'??? कहासे आयी ये आराधना... अचानक...जन्म के साथ-साथ? क्या ये 'राधा' का जन्म है? 'राधा' याने 'साधक'(Seeker) ...जो साधना चाहता है...! 'राधा' याने 'अपूर्णता का आभास' ... जो अब 'पूर्णसे' जुडना चाहती है... पूर्ण से एक-रूप होना चाहती है! लेकिन ये 'राधा'... अब.... 'आ' और 'ना' मे घिर गयी है... फंस गयी है..... "आ-राधा-ना"! लेकिन...क्या है ये 'आ' और 'ना'...? 'आ' मतलब 'आहे'( है) और 'ना' मतलब 'नाही' (नही)! राधा फंस गयी है अब... 'है और नही-है' के जाल मे.... आभास मे... संशय मे! जन्मके पहले ये आभास नही था... ना ही कोई संशय था... ना ही कोई 'अपूर्णता का आभास' था... 'राधा' का अभाव था... याने तब संपूर्णता मौजूद थी! 'कृष्ण' याने संपूर्णता... समग्रता... सर्वात्मकता... एकात्मकताका प्रतीक! जन्म के पहले दो नही थे इसिलिये दूरी भी नही थी... दूरी नही थी इसिलिये... अधूरापन नही था.....अधुरापन नही था इसिलिये सुखकी चाह नही थी और दुखःकी चिंता नही थी!

जब तक 'राधा' मौजूद है तब तक 'कृष्ण' नही...'राधा'की अनुपस्थिती याने 'कृष्ण' कि उपस्थिती! जैसेही 'राधा' यानेकी 'साधक-भाव' अनुपस्थित हो जाती है... याने 'अपूर्णता का भास' मिट जाता है फिर ‘राधा’ और ‘कृष्ण’ संम्पूर्णताकी सिर्फ दो अभिव्यक्ती बनकर रह जाती है! 'राधा'का मिट जाना याने 'आराधना' पूरी हो जाना! जहा दो मिट जाते है... दूरी भी मिट जाती है! आशा मिट जाती है फिर निराशा कहा होगी? आशा और निराशा एक ही सिक्के के दो अंग है! आशा का मिटना याने 'राधा' का कृष्णमे विलीन हो जाना! फिर कैसा रोना?

काहे को रोए... चाहे जो होए...!
सफल होगी तेरी... आराधना...!

'राधा'के होने मे... 'राधा'के रोने मे भी एक रस है प्रेम का...भाव का...विरह का....भक्ती का! 'राधा' एक मौका है अमृत तक पहुचनेका.. 'कृष्ण' से मिलन का! 'राधा' के होनेमे ही 'कृष्ण' के होनेकी संभावना छुपी है और फिर 'राधा'के खो जाने मे अमृत ही अमृत है जिसका कोइ ओर-छोर नही! आइये......आप सबको प्रेमकी इस 'अमृत नगरी' मे आमंत्रण है!

दीया टूटे तो माटी बने...
जले तो ये ज्योती बने!
आंसू बहे तो है पानी...
रुके तो ये मोती बने,
ये मोती... आंखोंकी पूंजी है, ये ना खोये!

काहे को रोए... चाहे जो होए...!
सफल होगी तेरी... आराधना...!

शुभचिंतन

जय गुरु

-नितीन राम
११ जुलै २०१२

http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the Question, Love is the Answer!

सलाम श्री आनंद बख्शीजी! RIP Rajesh Khanna!

Saturday, July 21, 2012

SELF Reminder... with love

Original Marathi post
सप्रेम आठवण
being translated by dear friend Rajesh
 
Reminder... with love
 
You forgot you forgot, you forgot ..you only forgot.

Lost in words, you forgot your worldlessness.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

In pursuing your pursuits, you forgot the original destination.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

You indulged so much in the colors of painting, but forgot the empty canvas.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

You look to meaning in words, but forgot the meaning in your own self.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

You drowned yourself in all the knowledge, but forgot this No-knowledge.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

In playing cards of belief, you forgot the ace of Self.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

In the game of winners, you forgot to cherish the supreme joy of losing,
You forgot, you forgot, you forgot your own Self.

In all the practices of oneness, you forgot unhappend deattachment within.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

In indulging in all experiences, you forgot the timeless Experiencer.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

In clinging to the game on edges, you forgot the flow itself.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

In running after happiness, you forgot the happiness within.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

In entangling youself with all the causes, you forgot the uncaused itself.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

That which is momentarily you hold, but the timeless you forget.
You forgot, you forgot, you forgot your own Self.

The lost can be searched & found
But
how about
the forgotten ONE...!!?
Hence this
Reminder....with love :-)

Jai Guru

Nitin Ram

Whatever the question, Love is the Answer!

Related links:

SELF Reminder ...
http://abideinself.blogspot.in/2012/09/self-reminder.html

Thursday, July 19, 2012

देव सापडत का नाही???

कसा सापडेल बरं...??
देव बसला आहे
भक्ताच्या पायापाशी...
सतत... अविरत!
आणि... भक्त मात्र शोधतो आहे
त्याला डोक्याने... सैरा-वैरा...!
भक्ताला वेळच नाहीये...
थोडे वाकून बघण्यासाठी...
जरासे झुकण्यासाठी...
थोडे थांबण्यासाठी...
त्याला ओळखण्यासाठी…
स्वतःला जाणण्यासाठी....

सप्रेम नमस्कार

जय गुरु

-नितीन राम
११ जुलै २०१२
http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.





Friday, July 13, 2012

I am useless...


I am useless… absolutely useless,
in case you are trying
to uncover
unknown answers
for the known questions!

I am useless… utterly useless,
unless & until
someone is ready
to unearth
the unknown questioner
and interested in
uprooting it!

Am ever thankful to the Master...
जिसने नाचीज को... नाकाम बना दिया.....!:-)

Jai Guru

With Love,

Nitin Ram
13 JULY 2012
 
Whatever the question, Love is the Answer!

Tuesday, July 10, 2012

Gestalt of Awakening


It is impossible
to awaken someone,
who is pretending to be Awakened.

It is impossible
to awaken someone,
who is trapped in gestalt of Awakening.

Jai Guru

With Love,

Nitin Ram
10 JULY 2012

Whatever the question, Love is the Answer!

Related Blog Posts:

Neither This nor That : http://abideinself.blogspot.in/2012/02/neither-this-nor-that.html

Realization: The Two Way Mirror: http://abideinself.blogspot.in/2011/09/realization-two-way-mirror.html 

Is it so difficult ...? : http://abideinself.blogspot.in/2011/10/is-it-so-difficult.html

What is fulfillment? : http://abideinself.blogspot.in/2011/07/what-is-fulfillment.html

Where is the difference? : http://abideinself.blogspot.in/2011/03/where-is-difference.html

The Eternal Nature: Our True nature:  

http://abideinself.blogspot.in/2011/03/eternal-nature-our-true-nature.html

Nishabda: The Wordless: http://abideinself.blogspot.in/2010/11/nishabda-wordless.html

Seeking or The Understanding? : http://abideinself.blogspot.in/2010/07/seeking-or-understanding.html

"शब्दा"चे विसर्जन---तोच "निशब्द": http://abideinself.blogspot.in/2010/07/blog-post_06.html

Sunday, July 08, 2012

Have you ever thought about this?


What did Krishna* realize?

You may be
knowing....

What
Krishna*
Taught.

But......

Have you ever
Thought
About...

What’s
THAT
Which
Krishna
Got?

What is THAT which Krishna* realized?????
What changed, transformed within Him,
After meeting His Guru Sage Sandipani??

What is THAT which Ram* realized?????
After meeting His Guru Sage Vasistha??
 
Have you ever thought about this?
Has anybody ever asked you this??
Has anybody ever told you about this?

Ok. . .
You may say that
some ‘knowledge’ was given by Sandipani or Vasistha.
Fine...
But then ....what exactly changed within Krishna* or Ram*
For them to realize their Real Nature
& discover the Silence within
to end the seeking?

Many read scriptures like Yoga Vasistha, Bhagawad Geeta
and some even by heart them.
Why don’t their seeking end????
Why the need for any need doesn’t cease?

You also might have read many scriptures.
Is there any need to read this post??????
Honestly, what’s the need?????
What’s more to be understood?

Although this question is in public/general domain, general (timepass) discussions are not anticipated. But anyone who is interested in dissolving the dis’ease’ that causes the psychological suffering, agony & prevents the unveiling of the Causeless Joy, is most welcome HERE.
This (blog) is certainly not an intellectual playground
but rather a background where all the unreal grounds may get dissolved
through the open approach, honest admissions & unconditional love.

You may share your experiential views and share your reflections, which could be helpful to some other friend or who knows... may be for you. You may share your honest notions or conceptual barriers which obstructed (or obstructing) you during the journey. You are welcome to ponder over this question by exchanging your own experiential understanding.

*Krishna (here) is synonymous to Osho or Nisargadatta or Ramana or Ram or Jesus or Mohammad or Buddha or any of those who realized their Real Nature.

Jai Guru

With Love,

Nitin Ram
01 JULY 2012

http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer.

Thursday, July 05, 2012

आत्मप्रेम - श्री निसर्गदत्त महाराज

अद्वैत्-वेदांताची अंतिम शिकवण देणारे श्री निसर्गदत्त महाराजांच्या १९७९ ते १९८१ दरम्यानच्या अप्रकाशित निरुपणांवर आधारीत 'आत्मप्रेम' हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे.

'आत्मप्रेम' पुस्तकातील काही निवडक अंश आपणाला येथे वाचायला मिळतील. श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण आत्मसात करण्यासाठी अथवा स्वत:ला स्वत:ची खरी ओळख होण्यासाठी, 'आत्मप्रेम' पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरू शकते. येथे सोबतच पुस्तकाची प्रस्तावनाही वाचायला मिळेल.

'आत्मप्रेम' हे  संग्रहणीय पुस्तक श्री रवींद्र कात्रे ह्यांच्याकडे तसेच काही निवडक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. रवींद्र कात्रे, पुणे (संपर्क): ९५५ २५२५ ४३१
Email: rbkatre@gmail.com / abideinself@gmail.com


'आत्मप्रेम' पुस्तकातील निवडक अंश:

०१) आपण व्यवहारात असूनही 'वेगळे' आहोत असे जाणून शांत स्थिर रहा!

 आपण असल्याची जाणवती जाणीवकळा सहन होत नाही म्हणून लोक हा सारा व्यवहार करतात. नानाप्रकारची करमणूक होते, स्वतःपासून पलायन करण्यासाठी. एकांतात बसून स्वतःकडे पहात राहून स्वतःला सामोरे जाणे हे सर्वात मोठे शौर्य आहे. आज जी माणसे आहेत त्यांच्यापे़क्षा मेलेल्या माणसांची संख्या केवढी मोठी? त्यांचे कोट्यवधी माणसांचे वजन कोठे गेले? ती काय करत असतील? याचे उत्तर... ती जन्माला येण्यापूर्वी जशी होती तशीच आहेत. - श्री निसर्गदत्त महाराज

 *****

०२) हे गहन आहे पण कळले तर सोप्पे आहे!

आपणाकरिता आपली गरज काय, तिचा उपयोग काय याचा येथे निवाडा होतो. येथे भूत-भविष्य सांगितले जात नाही.

जेवढे कळते तेवढे निघून जाणार आहे. प्रत्येकाला आपण असावेसे वाटते. पण ते चिरकाल टिकत नाही. आपले गुप्तपण, आपली योग्यता सहसा कोणी उघड करून सांगत नाही. दिसते तसे आपण नसून पहातो तसे आपण आहोत. आपण मरणार ही आपली खात्री आहे ती खोटी आहे. गोचर अगोचर होईल. आपण अगोचर आहोत. पाणी आटले, दिवस मावळला, बत्ती विझली म्हणजे मेली नाही. मृत्यु शब्दाचा हा अर्थ घ्या. जेवढे कळते तेव्हढे गळते. ज्याला कळते तो शांत आहे. आपण मरणार नाही पण जे गोचर झाले आहे ते अगोचर होणार, दिसणार नाही. या अगोचरालाच देव, ब्रह्म इत्यादी नावे दिली गेली आहेत. सगळा नामाचा बाजार आहे. नावानेच सगळा व्यवहार चालतो आहे. आपल्या आठवणीला आपल्या गुरुने दिलेला देव समजून आकाररहित भजा. सर्व व्यवहार म्हणजे केवळ करमणूक. या वयात ही करमणूक, त्या वयात ती करमणूक, प्रत्येक वयात वेगवेगळी करमणूक होते. - श्री निसर्गदत्त महाराज

*****
 
आत्मप्रेम:

प्रस्तावना - नितीन राम


तुम्ही स्वतःला जे समजता, स्वतःला जे काही म्हणून ओळखता त्याच्या पलिकडे तुम्ही किंवा कोणीही सदगुरुला ओळखू शकत नाहि. तुमच्या ठिकाणी तुमची ओळख जर 'मी देह' अशीच असेल तर सदगुरुही तुम्हाला देहधारी व्यक्ती इतकेच दिसेल. सदगुरु म्हणजे सर्वस्व... सर्व-स्व... सर्वच-स्व! निसर्गदत्त म्हणजे हेच हे सर्वस्व...स्वरूप... निरंजन... निरंतर... निरावलंब… स्वरूप. निसर्गदत्त म्हणजे अनंत, अखंड, अबाधित परमात्म स्वरूप… जे माझे, तुमचे आणि प्रत्येकाचेच कायम स्वरूप आहे.

नदीला कधी तहान लागते का! नदीला कधी कुठे थांबावेसे वाटते का! नदीला कळत पण नाही कि ती कशी कोठे आणि का वाहते आहे. तशीच काहिशी हि अवर्णनीय अवस्था आहे ज्यात कळतेपण पण नाही आणि अकळतेपण पण नाही. जेव्हा जे जे हवे आहे ते ते सहजपणे येते आहे किंवा जाते आहे. येणारे पण आपण नाही आणि जाणारेपण आपण नाही. आहे काय तर फक्त जाणार्या आणि येणार्या चे जाणतेपण! जे कधीच कोठुनही आलेले नाही आणि कधीच कोठे जाणार पण नाही. जे जे येते आहे किंवा जाते आहे असे दिसते आहे, ते ते... तो तो... सर्व भ्रम...आभास! केवळ क्षणिक आभास.... मग हा क्षण कधीतरी पन्नास वर्षांचा असेल तर कधीतरी शंभर वर्षांचा. पण आपले स्वरूप जे सत्य-नित्य आहे ते ह्या छोट्या-मोठ्या क्षणांवर कदापिही अवलंबून नाही. ते आहे निरंजन... निरावलंब... निरंतर. सद्गुरुंची कृपा आहे...जी अनंत आहे… अव्यहत आहे… वाहतेच आहे... आणि त्याचेच दुसरे नांव आहे "स्वरुप". ह्याच आपल्या कायम स्वरुपाची सत्य-नित्य ओळख करून घेणे हेच आध्यात्माचे वास्तविक प्रयोजन.

विश्वामधे अनादी कालापासून...संत परंपरा चालत आलेली आहे. प्रत्येक कालानुसार अनेक स्वरुप ज्ञानी संतांचे अवतरण झालेले आहे. सर्वसामान्य प्रापंचिकांना त्यांनी परमार्थाच्या वाटेवर पदोपदी मार्गदर्शन केलेले आहे. प्रपंचात राहून परम-अर्थाचा बोध झालेले अनेक स्वरुप ज्ञानी आपल्याला माहीत आहेत. याज्ञवल्कऋषी, जनक राजा ह्या प्राचीनकाळातील आत्मज्ञानी सत्पुरुषांपासून अगदी अलिकडील संत गोराकुंभार, संत एकनाथ, तुकाराममहाराज, गोंदवलेकर महाराज असे अनेक संत आपल्याला परिचित आहेत. समर्थांनी तर..."प्रपंच करावा नेटका" हा..स्पष्ट संदेशच देउन ठेवला आहे. अशा या अनंत संत परंपरेमधील विसाव्या शतकातील एक स्वरुपज्ञानी संत म्हणजे नाथपंथातील ईंचगिरी संप्रदायाचा वारसा लाभलेले सदगुरु श्री निसर्गदत्त महाराज.

सदगुरु श्री निसर्गदत्त महाराज (१८९७-१९८१) देहरुपाने मुंबईमध्ये राहिले आणि हजारो देशी-विदेशी साधकांशी त्यांनी त्यांच्या खेतवाडीतील निवासातून सुखसंवाद साधला. अनेकांची त्यांच्यावर प्रिती बसली आणि ते स्वगृहात जागे झाले. अनेकांनी त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तरातून संवाद साधला आणि आपले शंका-निरसन करून घेतले.

हे आत्मप्रेम आहे तरी काय? श्री निसर्गदत्त महाराजांच्याच स्पष्ट शब्दात येथे पाहूयातः

"प्रेम हे नाव नव्हे, प्रेम हा शब्द नव्हे...प्रेम हे आपण असल्याचे ज्ञान आहे आणि त्याची तुम्हाला आवड आहे. आपण असल्याचे ज्ञान म्हणजे प्रेम आहे त्याची तुम्हाला आवड आहे आणि ती आवड सहवासाला ठेवण्याकरता नाना सायास करावे लागताहेत. या जगामध्ये जो व्यापार चाललेला आहे तो आपण असल्याची प्रेमाची आवड सहवासाला ठेवण्याकरिता. ती सहवासाला राहणार नाही हे माहिती आहे; तरि पण ती आवड सहवासाला ठेवण्याकरिता हे सर्व व्याप करावे लागतात. .....हेच ते आत्मप्रेम."

 "तू असलेल्या प्रेमाला ब्रह्म नाव आहे. तू असल्याचे प्रेम हे जग म्हणून आहे. तू आहे हे प्रेम ह्याला सगळी नावे आलेली आहेत. ते जे प्रेम वावरले त्याची ख्याती, किर्ती आणि इतिहास निर्माण झालेला आहे. आपण असल्याचे प्रेम हेच ईश्वराचे ईश्वरतत्व, ब्रह्माचे ब्रह्मतत्व्...केवळ ब्रह्म."

 "तुला या जगामध्ये तू असलेल्या प्रेमाशिवाय काय आवडते ? तू असल्याचे प्रेम आवड्ते म्हणून सगळे काही आवड्ते. तू असल्याचे प्रेम ही प्रबळ इछा, ही प्रबळ वासना, ही प्रबळ आशा...तेच ते आत्मप्रेम. तर आशा, इच्छा, वासना कोणाकरिता आहेत ते बघ, तू नसलास तर. स्वतःची इछा, स्वतःची आशा स्वतःचे प्रेम हे उघड झाले पहिजे."

 "तू देहाला धरून बाहेरच्या विषयावर आशा, इच्छा, वासना मागतो आहेस्. तुझी आशा कर, तुझी इच्छा कर. न वांछीता आहे त्याची वासना काय आहे तर आपण पाहिजे", मी हयात पाहिजे". तू स्वतः सुखाचा आगर आहेस, तू सुखाचा सागर आहेस......पण तू त्याच्यामध्ये पोहोचशील तेव्हा. देहाच्या ओळखीने ज्या काही मागतोस....आशा, इच्छा, वासना...ती सगळी अधोगती... आणि स्वत:करता मागशील ती उर्ध्वगती.....ती पूर्णगती!"

येथे प्रत्येक जण काहितरी नक्की शोधतो आहे. काय बरे शोधतो आहे प्रत्येक जण! कोणी धन तर कोणी पद, कोणी तृप्ती तर कोणी अमरत्व, कोणी सुख तर कोणी आनंद, कोणी शांती तर कोणी शाश्वतता, कोणी निशंकता तर कोणी समाधान! तुम्ही त्याला संज्ञा काहीही द्या पण प्रत्येकाचा शोध मात्र चालूच आहे. ह्या सर्व संज्ञांकडे जर प्रज्ञेने पाहिले तर लक्षात येते कि प्रत्येक व्यक्ती फक्त एकच "वस्तु" शोधत आहे. सर्व-सामान्यपणे सुख, शांती, समाधान येते आणि काही क्षणात नाहिसे पण होते. वरकरणी काहिही दिसले तरी प्रत्येकाचा शोध हा शाश्वततेचा, परम-तत्वाचा आहे. प्रत्येकाचा शोध हा आपल्याच मूळ स्वरुपाचा आहे. ह्या शोधामागचे खरे कारण काय बरे असावे? सर्वात मूळ कारण म्हणजे बहुतांश साधकांची आपण व्यक्तीरुप आहोत ही दृढ धारणा! दुसरे कारण म्हणजे आपण अपूर्ण आहोत ही धारणा. तिसरे कारण म्हणजे आपण अस्तित्वापेक्षा वेगळे आहोत ही धारणा. आणि अनुषंगाने चौथे कारण म्हणजे पूर्णतेसाठी किंवा एकरुपतेसाठी "मी काहीतरी करायलाच पाहिजे" ही एक धारणा.

प्रत्येक साधकाच्या विविध अशा पारमार्थिक धारणा, संकल्पना, मान्यता असतात. ह्या धारणांच्या आधारावरच ज्याचा-त्याचा तथाकथित पारमार्थिक शोध चालू असतो. प्रस्थापित धारणांना शक्यतो धक्का लागू न देता शोध घ्यायचा असा बहुतांश साधकांचा आटोकाट प्रयत्नही असतो. हा शोध अनेक मार्गांने, साधनांद्वारे चालू असतो. कोणी ग्रंथ, शास्त्र, पुस्तक, वचने ईत्यादी वाचन करतो तर कोणी नित्यनेम, जप-तप, ध्यान, योग अशा अनेक क्रिया अनुसरतो. अधिकतर साधकांचा 'क्रियेवर, आलंबनावर', साधण्यावर' विश्वास असतो तर फारच थोड्या साधकांची 'मी कर्ता' ह्यावरच दाट संशय असतो. येथे व्यक्ती तितक्या प्रकृती, जितक्या प्रकृती तितके दृष्टीकोन आणि जितके दृष्टीकोन तितके अंगुलीनिर्देष. (Pointers)

श्री निसर्गदत्त महाराजांकडे अशाच विविध प्रकृतींचे साधक येत आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या स्वभावाला अनुसरुन अंगुलीनिर्देष होत असे. भक्तिमार्गी, ज्ञान-जिज्ञासू अशा सर्वांना मुंबईतील त्यांच्या छोटेखानी आश्रमात मुक्त प्रवेश होता. सर्वसामान्य नोकरदारांपासून प्राध्यापक, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, उच्च शासकीय अधिकारी, राजकीय पुढारी अशा सर्व थरातील जिज्ञासू त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत. श्री महाराज नेहमीच, अद्वैताच्या स्थिर बैठकीवरून आणि फक्त स्वानुभुतीच्या आधारावर स्वरुप-ज्ञान सांगत. अगदी संक्षेपात सांगायचे तर त्यांची शिकवण म्हणजेच "निसर्ग-योग" आणि त्याचे मूल्-सूत्र म्हणजे... "स्व्"ला जाणा आणि "स्व"स्थ व्हा."

१९७८ ते १९८१ ह्या दरम्यान श्री निसर्गदत्त महाराजांचा देशी-विदेशी साधकांबरोबर झालेला संवाद येथे 'आत्मप्रेम' मध्ये आपल्याला वाचायला मिळेल. श्री महाराज साधकांना प्रामुख्याने दोन स्तरांवर मार्गदर्शन करत. श्री महाराज त्याला पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष म्हणत. "आत्मप्रेम" वाचताना साधक मित्रांनी हे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. एक साधक आहे ज्याची आपण फक्त देहरुप आहोत ही दृढ धारणा आहे, ज्याचे देह-आकाराशी पूर्ण तादात्म्य आहे; त्याच्यासाठी त्याच्या धारणेला अनुसरुन पूर्वपक्षातील ज्ञान दिले गेलेले आहे. जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ही पण एका अर्थाने अध्यात्माचा पूर्वपक्षच आहे. पूर्वपक्षातील साधकांसाठी श्री महाराजांनी मंत्रदिक्षा दिली, ध्यानयोग साधायला प्रोत्साहन दिले. साधकाची सर्वच्या सर्व दु:ख आणि त्रास त्याच्या केवळ देह तादात्म्यामुळे असल्याने ते तुटण्यासाठी श्री महाराजांनी सुरवातीच्या तीस वर्षात जे अव्यहत ज्ञान वाटले ते सर्व बहुतांशी पूर्वपक्षातले. हे पूर्वपक्षातील ज्ञान श्री महाराजांच्याच शब्दात येथे पाहुयात:

 "देह तुझे रूप नव्हे तर कायेमध्ये असलेली "आपण आहे" ही जाणीव, शब्दाविरहीत "शुद्ध असणेपण", कायेमध्ये असलेले मात्र केवळ ज्ञान...ते 'ज्ञान तुझे रूप' आहे. तेच जणू जगदात्म होउन राहीलेले आहे. तू असलेले ज्ञान जिथे नसेल, तिथे जगाचाही अनुभव नसेल तर तू असल्याचे ज्ञान आहे हेच तू आहेस... ऐकल्याप्रमाणे ते ध्यानात ठेव...त्याचे ध्यान कर....ते ध्यानात धर. पण काय धरशील तर "तू आहेस हे ज्ञान". त्या ज्ञानाने, ज्ञानाला आपल्या ध्यानात ठेवावे. ऐका !!! त्या ज्ञानाने, ज्ञानाला आपल्या ध्यानात ठेवावे. हे ज्ञान हाच ईश्वर आहे, ह्या ज्ञानापलिकडे अजून कोणताही ईश्वर नाही म्हणून तू ह्या ज्ञानाचीच पूजा कर, भक्ती कर."

 "मी आहे ही जाणीव हाच देव, हाच ईश्वर, तीच माया. माया म्हणजे देवाची शक्ती. देवाची जेवढी नावे आहेत ती 'आपण आहे' ह्या जाणीवेचीच. पण देह म्हणजे आपण नव्हे हे पक्के ठसले गेले पाहिजे. हे साधकाचे लक्षण."

 "कायेत जे आत्मप्रेम निर्माण झालेले आहे तोच ईश्वर. ते आत्मप्रेम प्रसन्न होण्याकरता त्यालाच गुरु, ज्ञान, भक्ती असे म्हणून भजा. तुमचे आत्मप्रेम तुमच्या ध्यानात येण्यासाठी गुरुचे ध्यान केले पाहिजे, त्या आत्मप्रेमालाच गुरु मानून. आत्मप्रेमावेगळे अवतारी, माया, ब्रह्म दुसरे नाही."

 "ध्यानयोग साधा. मी देह नव्हे, मी केवळ शुद्ध ज्ञान आहे या निश्चयाने रहावे. मग आतूनच ज्ञानाचा झरा वाहील."

 "नामस्मरणाने प्राण शुद्ध होतो. प्राण शुद्ध झाल्यावर मन शुद्ध होते व मग सत्व शुद्ध होते. हे सत्व मग आपली सगळी हकिकत सांगते.”

पूर्वपक्षातील साधकांची देहरुप म्हणजेच आपण हि दृढ श्रद्धा, कार्यकारणावर असलेली श्रद्धा पाहून श्री महाराजांनी त्याला विविध आलंबने दिली. जो पर्यंत साधकाच्या ठायी 'मी आहे' ह्या सहज स्फुरलेल्या जाणीवेबरोबर 'मी वेगळा' आहे हे भान आहे तो पर्यंत त्याला कोठल्याही क्रियेचे आकर्षण आहे, काहितरी मिळवायची चिंता आहे, कोठेतरी पोचायचे आहे आणि तोपर्यंत त्याला विविध साधने आणि आलंबने दिलेली आहेत.

दुसर्‍या स्तरावरील एक साधक आहे ज्याची कोणत्याही साधनेद्वारे असो अथवा अवचितच पण स्वत;च्या अनुभवातून "देह आपण" ही श्रद्धा ढळलेली आहे किंवा आपले देहरुप हे आपले मूळस्वरूप नाही हे ज्याला उमजलेले आहे, त्याच्यासाठी उत्तरपक्षातील ज्ञान दिले गेलेले आहे. कृष्णाने उद्धवाला सुरवातीला पूर्वपक्षातले ज्ञानमार्गदर्शन केले आणि एक वेळ अशी आली कि कृष्णाने हे जे आत्तापर्यंत उद्धवाला दिलेले ज्ञान होते ते विसरून जायला सांगितले. स्वाभाविकपणे उद्धव बेचैन झाला, अस्वस्थ झाला आणि मग त्याला कृष्णाने अंतिम म्हणजेच उत्तरपक्षातील ज्ञान (अंगुलीनिर्देष) दिले आणि उद्धव कायमचा मोकळा झाला. उद्धवाला कृष्णाने दिलेल्या उत्तर पक्षामधील ज्ञानाबरोबर त्याचे कृष्णावर निस्सिम प्रेम व अपार श्रद्धा होती हे पण येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. ह्या प्रेमाच्या, श्रद्धेच्या, भक्तीच्या नैसर्गिक वंगणामुळे कृष्णाने दिलेल्या अंतिम ज्ञानाबाबत विवेक करणे उद्धवाला सहज आणि सुलभ झाले. अंतिम अवस्थेत जर ज्ञानातून शुद्ध प्रेम उपजत नसेल तर ते ज्ञान केवळ शाब्दीकच ज्ञान ठरते आणि ते साधकाला कायमचे मोकळा करण्यास असमर्थ ठरते. ज्याप्रमाणे प्रेमाची पूर्णता हे आत्मज्ञानाचे अवतरण त्याचप्रमाणे ज्ञानाची पूर्णता म्हणजे शुद्ध प्रेमाचे अवतरण. पूर्वपक्षामधे जरी ज्ञान व प्रेम हे दोन्ही वेगळे घाट, मार्ग दिसत असले तरी उत्तरपक्षामध्ये हे दोन्ही आपल्याच स्वरुपाचे अविभाज्य अंग म्हणून उघड होतात आणि त्यांमधील भासमय द्वैत सहजच विरून जाते. उत्तरप़क्षामध्ये सर्व काम फक्त विवेकाचे आहे. श्री महाराजांच्याच भाषेतः

"जे जे तुम्ही नाहि ते नाहिसे करा. येथे क्रियाधर्माचा संबंध नाही. भगवतगीतेमधे योगाभ्यास सांगितलेला आहे पण अर्जुन व उद्धव यांना तो करावा लागला काय? अर्जुन व उद्धव ऐकता ऐकताच ज्ञानी झाले कारण सांगणार्याग कृष्णावर त्यांची खरी प्रिती होती. इतर लोक क्रिया, साधना यांमध्ये गुरफटून जातात."

 "तुमच्याकरता तुम्ही म्हणून काय आहात या एकाच गोष्टीचा विचार करा. दुसर्यांचा करू नका. तुम्हाला तुम्ही असल्याची कल्पना का व केव्हा झाली याचा विचार करा.'

 "तीव्र बुद्धीचा कोणी असेल तर नुसत्या श्रवणानेही अल्पकाळात मुक्त होतो."

 "जो जो अनुभव येतो, जगाच्या अनुभवासहित या अनुभवांचा कर्ता-करवीता कोणीही नाही. आपोआप सर्व होत आहे."

 "खरोखर वस्तुस्थिती काहिच नाही. ज्याला शेंडा ना मूळ त्याला वस्तूस्थिती कसली? तरीपण आपापल्या कल्पनेप्रमाणे लोक काहितरी साधना करत राहतात. उगी राहता येत नाही म्हणून या सार्‍या गोष्टी अंगावर ओढून घ्याव्या लागतात."

"आमच्याकडे येऊन कोणी पाच-सहा वाक्ये जरी ध्यानात ठेवली तरी त्याला आणखी काही परमार्थ करायला नको."

 "पुष्कळ वाचलेत, पुष्कळ ऐकलेत. आता वाचणार्‍याची, ऐकणार्‍याची सत्य-नित्य ओळख करून घ्या."

"मी आहे" ही जाणीव आल्यापासूनच हा खटाटोप चालू झालेला आहे. सुखदु:खांची जाणीवसुद्धा मी असल्याच्या जाणीवेमुळेच होते आहे. सर्वात लबाड काय असेल तर ती ही जाणीव आहे. कारण हि जाणीव म्हणजे देहअन्नाच्या रसातील सत्त्वगुण आहे. आणि त्यामुळे ही जाणीव कालधर्मी आहे, हंगामी आहे. आपण आहे असे कळते आहे पण कळते आहे ते आपण नव्हे, ज्याला कळते आहे ते आपण. जाणीव ज्याला जाणवते आहे ते आपण. जाणीवेने जेवढे जाणवते आहे तेवढे जाणीवेसहीत जाणार आहे, पण जाणीवेचा "जाणता" जाणार नाही."

या ठिकाणी पाहिले तर लक्षात येइल कि पूर्वपक्षातील आणि उत्तर पक्षातील श्री महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये स्वाभाविक विरोधाभास दिसून येतो. पूर्वपक्षामध्ये साधकाचे देहतादात्म्य तोडणासाठी ज्या जाणीवेला ते ईश्वर रूप संबोधतात त्याच जाणीवेला ते उत्तरपक्षामध्ये लबाड म्हणतात. या विरोधाभासाकडे सत्यशोधक साधक मित्रांनी विवेकाने आणि प्रज्ञेने पाहणे आवश्यक आहे अन्यथा श्री महाराजांची बोधवाक्ये त्यांना अजुनच संभ्रमात टाकतील. खरं तर सत्य हे आपले स्वरुप आहे आणि ते शब्दातीत आहे, सर्वसमावेशक आहे तसेच विरोधाभासीही आहे. कोठ्ल्यातरी दृष्टीकोनातून त्याचे वर्णन करायला गेले कि त्याचे एक अंग अभिव्यक्त होते. दृष्टीकोन बदलताच त्याची अभिव्यक्ती बदलून जाते. ती नुसतीच बदलत नाही तर ती पूर्ण विरोधाभासपूर्ण वाटू लागते. ह्यासाठी सत्याकडे सर्वांगाने बघणे आवश्यक आहे. असे पाहण्याने सर्व विरोध मावळून जातात, संभ्रम मिटतात आणि हेच सत्य आपलेच स्वरुप म्हणून कायमचे उघड होते.

ज्याप्रमाणे डॉक्टर रोग्याच्या आजाराप्रमाणे त्याला औषधांची मात्रा देतो. ज्याप्रमाणे नवजात अर्भकाला शुद्धरुपामध्ये दूध दिले जाऊ शकत नाही त्याच प्रमाणे ज्याच्या त्याच्या प्रकृती आणि आकलन शक्ती प्रमाणे त्याला ज्ञान मार्गदर्शन मिळत जाते अथवा दिले जाते.

एक आहे शब्दाचा बोध, शब्दार्थामुळे झालेला माहितीवजा बोध, अभ्यासातून झालेला बोध, शाब्दिक बोध. हा बोध म्हणजे हॉटेल मधील मेनूकार्डावरील सर्व मेनू पाठ झाल्यासारखा आहे किंवा एखाद्या पदार्थांची पाकक्रीया पाठ होण्यासारखे आहे. ह्यात अभ्यास व पाठांतर तर जरूर होते पण ‘भूक’ मात्र नक्कीच भागत नाही. विविध शात्रांचा, ग्रंथांचा अभ्यास जास्तीच जास्त काय देउ शकतो तर पांडित्याची एखाधी मोट्ठी पदवी किंवा एखादा पुरस्कार ज्याने मिळतो लोकसन्मान, प्रतिष्ठा. पण चिरस्थायी समाधान नक्कीच नाही... त्याने आपल्याला आपल्या 'कायम' स्वरुपाचा बोध मात्र नाही मिळत. जे बुद्धीच्या अलिकडचे आहे ते नंतर उपजलेल्या बुद्धीच्या आधाराने कसे काय कळणार ! हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान', वास्तविक ‘ज्ञान आणि अज्ञानाच्या अलिकडे व पलिकडे’ असलेल्या आपल्या खर्‍या कायम स्वरुपापर्यंत कधीच पोचू शकत नाही. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान' फक्त मूळ सदवस्तूकडे, स्वरूपाकडे निर्देष करण्यापर्यंतच कामाचे आहे हे ‘जाणले’ तरी स्वरूपबोध ‘उघड होण्यास’ यत्किंचीतही वेळ लागू शकत नाही. दुसरा बोध आहे तो म्हणजे आपणाला आपला बोध, स्वरुप-बोध. आपल्याच अनंत आणि निराधार स्वरुपाचा बोध. हा आत्मबोध म्हणजे शून्याच्या पाढ्यासारखा बोध. शून्याचा पाढा कोणीही कधीतरी पाठ करतो का हो! हा बोध म्हणजेच अकारण आनंद, येथे आहे सहज विश्रांती.

'आत्मप्रेम' निमित्ताने सुरु झालेल्या ह्या आध्यात्मिक प्रेमयात्रेसाठी साधकमित्रांना अनेक शुभेच्छा. 'आत्मप्रेम' वाचताना एकावेळी काही निरुपणे/बोधवाक्ये वाचून त्यावर स्वतंत्र चिंतन, मनन झाल्यास साधकांना स्वरूपबोध ‘उघड होण्यास’ नक्कीच सहज आणि सुलभ होईल ह्यात यदकिंचितही शंका नाही. आत्मप्रेम मधील श्री निसर्गदत्त महाराजांच्या वचनांच्या दुधारी तलवारीच्या वारामधून कोणीही साधक न वाचो ही सदिच्छा. जो साधक ह्या वारातून आपला बचाव करणार नाही तो खर्‍याअर्थाने कायमचाच वाचेल हे निश्चीत आहे.

'आत्मप्रेम' मधील श्री निसर्गदत्त महाराजांच्या निरुपणांचे मूळ संकलक गुरुबंधू श्री दिनकर केशव क्षीरसागर ह्यांचे आठवणरुपी अनेक आभार. आत्मप्रेमचे संपादक व प्रकाशक मित्र आणि गुरुबंधू श्री रवींद्र कात्रे आणि त्यांचे सहकारी ह्यांनी घेतलेल्या अथक आणि गोड परिश्रमाबद्द्ल अभिनंदन. येथे ही प्रस्तावना लिहिण्यास प्रवृत्त करून ती लिहून घेतल्याबद्दल सदगुरु श्री निसर्गदत्त महाराजांना शतषः प्रणाम. जय गुरु.

सप्रेम नमस्कार.

-नितीन राम
www.abideinself.blogspot.com





Saturday, June 30, 2012

जे सदैव... तेच आत्मस्वरूप


कस्तुरीच्या शोधात सैरावैरा फिरणारेकस्तुरीमृग

जे 'सदैव' त्याला 'आहे-नाही' चा भास नाही... 'असणे-नसणे'' हा भास. जे 'सदैव' ते 'आहे-नाही' च्या भासावर अवलंबून नाही. जे 'सदैव' ते 'आहे-नाही'च्या भासाच्या पलिकडचे. जे सदैव ते 'असणे-नसण्याच्या' पलिकडचे. जे सदैव त्याला अस्तित्वाची चौकट असत नाही. जे सदैव त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज असत नाही. जे सदैव त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज उरत नाही. जे सदैव तेच आत्मस्वरूप.

जे सदैव तेच अनंत. जे सदैव तेच निरंतर, जेथे अंतर उरत नाही. सदैव तेच जे सर्व 'जर-तर' च्या पलिकडचे. सदैव तेच जे सर्व प्रश्न-उत्तरांच्या पलिकडचे. सदैव तेच जे आत्ता आणि इथे आहे...आणि आहेच. सदैव तेच जे कोठुन येत नाही आणि कोठेही जात नाही.

जो येतो आणि जातो...तो 'आहे-नाही' चा भास. 'जाग-झोप' हा भास.....'जन्म-मृत्यू' चा भास. 'वेगळेपणाचा' भास आहे म्हणून तर सर्व त्रास आहे. 'वेगळेपणाचा' भास हाच मूळ आभास आहे. 'वेगळेपणाचा' भास मिटला कि मग कोठला त्रास...???

वेगळेपण मिटणार नाही पण मिटेल तो फक्त 'वेगळेपणाचा' भास. हे कसे काय ? ज्याप्रमाणे आपल्या डाव्या हाताकडे 'आपण डावा आहोत' किंवा 'आपण उजवा नाही आहोत' किंवा आपण शरीरापासून वेगळे आहोत हा भास नाही आणि तरिही डाव्याबाजूला असलेली वस्तु उचलायची वेळ आली की हा डावा हात आपसूक पुढे येतो आणि वस्तु सहज आणि आपसुक उचलली जाते ना? अगदी तसेच आहे हे.

त्याचप्रमाणे जन्म ते मृत्यू ह्या कालखंडात आपल्या देहाचे वेगळेपण मिटणार नाही पण आपण ‘फक्त देह’ आहोत ही भासमय धारणा मिटणार... ! का बरे ही भासमय धारणा आहे? गाढ झोपेमध्ये कोठे असते ही धारणा...कोठे असतो हा 'वेगळेपणाचा भास' ? असतो का ??? जागेपणीच्या सोळा तास जो 'भास' कायम उपस्थित असतो तो झोपेमध्ये आठ तास कोठे जातो बरे?? वर्षोंवर्षे हाच उपक्रम सतत चालू आहे ना... का नाही? फक्त त्याकडे आपले लक्ष जात नाही इतकेच....!

झोपेमध्ये आहे का कसली चिंता... कसला त्रास... सुखाची अपेक्षा अथवा दु:खाची उपेक्षा ? झोपेमध्ये आहे का कसली चिंता... कसला त्रास... सुखाची अपेक्षा अथवा दु:खाची उपेक्षा ? ज्याप्रमाणे झोपेमध्ये सुख-दुखःरहित पूर्णता असते तशीच जागृती अवस्थेमधेही संपूर्णता उघड होउ शकते. हेच ते ‘सदैव स्वरूप’, ज्याला 'आहे-नाही' चा भास नाही. ते 'आहे-नाही' च्या भासावर अवलंबून नाही. त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज उरत नाही.

तुझे आहे तुजपाशी... परी तू जागा चुकलासी!

जय गुरु

सप्रेम नमस्कार.

नितीन राम
०९ जून २०१२

http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

Related posts:

तूच रे... तूच रे
http://abideinself.blogspot.in/2012/06/blog-post_26.html
'मी' कोण आहे? - एक सोप्पे कोडे!
http://abideinself.blogspot.in/2012/05/blog-post.html
'मी' कोण आहे? : मूळभूत प्रश्न
http://abideinself.blogspot.in/2012/03/blog-post.html
तो ‘तू’ नव्हे !
http://abideinself.blogspot.in/2011/09/blog-post_17.html
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे
http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html
ह्या क्षणात 'स्थित' होणे शक्य आहे का...!!!
http://abideinself.blogspot.in/2011/07/blog-post.html
सत्य एकच आहे
http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post_04.html
सदगुरु म्हणजे सर्वस्व
http://abideinself.blogspot.in/2010/07/blog-post_12.html

Friday, June 29, 2012

Why so much obsession for the Past?

It is often seen that,
Dead & distant
are
Kissed
&
Live & instant
are
Missed! ;-)

Is that so? Why…..???

It could be;
Temples
Thoughts
Treasures
Teachings
Teachers
And the most important
THAT*,
What we really are eternally.
(*closest/instant)

What are the reasons, obstacles, fears for,
Obsession of the Past… Dead… Distant
&
Allergy for the Present… Now… Live… Instant?

Are you Dead or Alive...???????

The Sincere & honest probe… investigation could lead to
re-clicking of this eternal NOW Clock once again ;-)!

Best wishes. Thank you so much!

With Love... Jai Guru

Nitin Ram
27 June 2012

http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer!

Related link:
घंटा http://abideinself.blogspot.in/2011/01/blog-post_21.html

Tuesday, June 26, 2012

तूच रे... तूच रे …


Picture Courtesy: Shaantanu Kulkarni

असण्याच्या अलिकडे... नसण्याच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
जीवनाच्या पडद्यावर...
तूच रे... तूच रे !

आरश्याच्या अलिकडे... आरश्याच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
क्षणिक प्रतिबिंबात...
तूच रे... तूच रे !

आकाशाच्या अलिकडे... आकाशाच्या पलिकडे
आणि दोन्ही मधल्या
नभ-रुपी देखाव्यात...
तूच रे... तूच रे !

पाटीच्या अलिकडे... पाटीच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या  
रंगीत रेघोट्यांत...
तूच रे ... तूच रे !

वातीच्या अलिकडे... वातीच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
निर्मल प्रकाशात...
तूच रे ... तूच रे !

जाणीवेच्या अलिकडे... जाणीवेच्या पलिकडे
आणि दोन्ही मधल्या
जाणवत्या जाणीवेत...
तूच रे... तूच रे !

आधी... मधी... आत्ता... नंतर
आधीच्या आधी आणि मधीच्या नंतर

तूच रे... तूच रे तो 'कायम' !

तूच रे... तूच रे तो 'अथांग' !

तूच रे... तूच रे तो 'अनंत' !

जय गुरु

सप्रेम नमस्कार

-नितीन राम
२५ जून २०१२

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

Monday, June 18, 2012

काय सांगु आता सदगुरुंची ख्याती...


सदगुरु आले वार करून गेले
'जे नव्हते' त्याला मारून गेले,
'जे होतेच' त्याला तारून गेले!
सदगुरु आले वार करून गेले!

सदगुरु आले वार करून गेले
प्रेमाच्या ह्त्याराला प्रेमाची धार,
प्रेमाचा वार त्यांचा....
हृदय चिरून गेले.....!

सदगुरु आले वार करून गेले
ह्त्याराला त्यांच्या दुहेरी धार,
ज्ञानाची बोथट तर प्रेमाची धार फार!
गेले ते गेले पण ह्त्यार सोडून गेले!

सदगुरु आले वार करून गेले
आभार कसे मानु त्यांचे,
सांगा उपकार कशाने मानु...?
जाता-जाता माझे सारे शब्द घेऊन ते गेले!

सदगुरु आले वार करून गेले
अंताची सुरुवात आणि
सुरुवातीचा अंत करुन गेले!

जय गुरु

सप्रेम नमस्कार

-नितीन राम
२५ मे २०१२

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

Monday, June 11, 2012

आकाराच्या व्याख्येमध्ये 'निराकार' बसणार?















ढग खाली पडू शकतो... येऊ किंवा जाऊ शकतो,
पण आकाश कोठे आणि कसे पडणार?
लाट खाली पडू शकते... येऊ किंवा जाऊ शकते,
पण समुद्र कोठे पडणार आणि कोठे जाणार?
ठिणगी खाली पडू शकते... येऊ किंवा जाऊ शकते,
पण अग्नी कोठे आणि कसा पडणार?

सर्व भीती आकाराला... सर्व चिंता आकाराला...
उदय आकाराला...अस्त आकाराला...
शोधाची गरज आकाराला... क्रोधाची भीती आकाराला....
श्रद्धा आकाराला.... संशय आकाराला....

आकाराला दिसू शकतो फक्त आकार...
आकाराच्या व्याख्येमध्ये 'निराकार' कसा बसणार?

ह्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आग्रह नाही....
'ग्रह' मिटल्यावर कोठला आग्रह?
वाटले तर लिहा अन्यथा नाही....
काही प्रश्नांची उत्तरे नसतात...
काही प्रश्नांची उत्तरे प्रश्नातच असतात तर…
काहींची उत्तरे प्रश्नकर्त्याच्या विसर्जनातच असतात..... :-)

जय गुरु

सप्रेम नमस्कार

-नितीन राम
११ जून २०१२

www.abideinself.blogspot.com
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

Friday, June 08, 2012

प्रेम, एक अनमोल रसायन

डोळ्यावर चश्मा
'अहं-आकाराचा'
आणि
शोध मात्र
चालला आहे
'निराकाराचा' :-)!

मग ह्यावर उपाय काय ?

सदगुरुंच्या
प्रेमाच्या वर्षावामध्ये
'हा' चश्मा
कधी विरघळून जातो
ते कळत पण नाही.

प्रेम, एक अनमोल रसायन.
सदगुरु, एक अल्टीमेट अलचेमिस्ट...!

जय गुरु
-नितीन राम
०८ जून २०१२

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.



Thursday, June 07, 2012

The timeless NOW

Time is a
necklace
made up of
countless &
precious
diamonds
called ‘now’.
But each 'now'
is .... timeless!

Time is a conceptual necklace!

You are Timeless.

With Love,

-Nitin Ram
02 JUNE 2012
http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer.
 
Also read:
 
Shower of NOW: http://abideinself.blogspot.in/2010/08/shower-of-now.html?spref=fb
Show of NOW: http://abideinself.blogspot.in/2011/09/show-of-now.html?spref=fb

Monday, June 04, 2012

The Ultimate Gift

Picture courtesy: Shaantanu Kulkarni

What gift
can be offered
to 
the Master?

Your
'Body-Mind' spectacles...
& nothing else... :-)

Jai Guru

With Love,

Nitin Ram
02 June 2012

Faith... full of patience, The ultimate Anti-Virus!

According to Indian mythology and poetry, this bird (Chatak) drinks only rain water drop by drop as it pours down. However thirsty it may be, it does not drink any other kind of water, not from the streams, rivers or collected rainwater. It is said that this bird can live for many days without water.
Scientific name: Clamator jacobinus (Boddaert).
Common name: Pied Crested Cuckoo
Picture courtesy: Rajesh Panjwani


The most
Commonly found
Virus
In the
‘Seeker apparatus’
Is
‘Complain’ :-)

Faith …
full of patience;
The Ultimate Anti-Virus!

-Nitin Ram
31 MAY 2012

Whatever the question, Love is the Answer!

Thursday, May 31, 2012

Mind well… Mind is never a problem!


Mind well….
The world doesn’t operate
‘cause of your mind!
In fact…
it appears to exist
‘cause of your mind!

Mind is a friend;
Though little naughty.

YOU
are
Prior to
the mind
And
hence
separate!

Mind well… Mind is never a problem!

With Love,

-Nitin Ram
30 MAY 2012

Whatever the question, Love is the Answer!

What is compassion?

Picture courtesy: peveapastor

What is compassion?

The word
‘Compassion’
is found
in front of
‘LOVE’
In
my
empty
dictionary ! :-)

Thank you so much!

With Love,

Nitin Ram
31 MAY 2012

Whatever the question, Love is the Answer!

Tuesday, May 29, 2012

Neither eyes Nor mind


The eyes cannot catch the Fragrance.......!!! Lol

With Love,

Nitin Ram
29 June 2010

Whatever the question, Love is the Answer!

Related blog post:
Eye of the Heart

Wednesday, May 23, 2012

Definition of spirituality?


Picture courtesy: Jeannie McGillivray


MZ: What’s your definition of spirituality?

NR: Prior to addition & beyond subtraction! ;-)

Subtraction sans residues!

Thank you so much!

With Love,

Nitin Ram
23 MAY 2012

Whatever the question, Love is the Answer!

Tuesday, May 22, 2012

Is that knowledge?


What's the use
of
your knowledge
if it cant
Restore
the Eternal Innocence? :-)

With Love,

Nitin Ram
19 May 2012

http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer

What’s the recipe?


HP: What’s the recipe?

NR: Recipe for making No-thing? ;-)

There could be
umpteen recipes
for
making ‘something’.
But
can there be
any recipe
for
making ‘No-thing’??
Does ‘Nothing’
need
any recipe??? :-)

Being is ‘ease’… &
Becoming a dis’ease’!

Thank you so much!

With Love,

Nitin Ram
29 April 2012

www.abideinself.blogspot.com
Whatever the question, Love is the Answer!
 
'Nothingness' need 'Nothing'

Wednesday, May 16, 2012

Heart, the unexplored Capital


Heart,
the most
unexplored Capital!
Love,
the eternally
hidden Treasure...!

Whatever the Question,
Love is the Answer...!

With Love,

Nitin Ram
14 May 2012


Being Here is not different from Being Everywhere

Photo Courtesy: Erik Johansson

Krishna's* teaching
can be accessed
through Head,
while
His presence
felt
through Heart!

Head (Intelligence)
has
specific location
and time frame
but
Heart is beyond both...!

Whatever the Question,
Love is the Answer...!

*Krishna: Satguru/Master/Your own SELF

With Love,

Nitin Ram
16 may 2012

Heart, the unexplored Capital!